flairkarts

Sunday, 30 December 2018

घरगुती मसाले

“घरगुती मसाले”

      सन्माननीय सदस्य “Bhople M Deepak” यांच्या विनंतीवरुन..........

      त्यांच्या स्वादान्न ग्रुपवरील याच विनंतीवरुन अाॅगष्टच्या शेवटी मी ही पोस्ट स्वादान्न ग्रुपवर टाकली होती. कदाचीत त्यांच्या लक्षात आले नसेल म्हणुन त्यांनी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर पुन्हा विनंती केली अाहे. “sir pls whars app me All masale recipe to me”. त्यावरुन १७ सप्टेबर २०१७ रोजी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर तीच पोस्ट परत टाकली आहे. अाता आज २६ सप्टेबर २०१७ रोजी  तिसऱ्यांदा त्यांनी “आम्ही सारे खवैय्ये” या ग्रुपवरुन सेम मागणी केली आहे म्हणुन तिच पोस्ट परत या ग्रुपवर टाकत आहे. अाता तरी त्यांनी हि पोस्ट काॅपी करुन ठेवावी. किंवा परत ही मागणी करु नये. दुसरे महत्वाचे म्हणजे हे मसाले माझे नसल्याने यावरील सर्वच शंकाचे निरसन मी करु शकेलच असे नाही.

(विनोद सावंत यांचे विवीध प्रकारचे ३७ घरगुती मसाले काॅपी पेस्ट करुन टाकत आहे.)

मसाले (३७) विनोद सावंत यांचे खास मसाले रेसिपीज ( सावंत यांचा लालबाग ला मोठा व्यवसाय आहे मसाल्यांचा )
# विविध प्रकारचे घरगुती मसाले. #

१) @ सांभर मसाला. @
सांभर करायच्या वेळीच हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाच केला तरी चव अजून छान लागते.
* साहित्य :-
१२० ग्रॅम धणे
८० ग्रॅम जीरे
३० ग्रॅम काळी मिरी
३० ग्रॅम सरसो
३० ग्रॅम मेथी
२० ग्रॅम अख्खी लाल मिरची
३० ग्रॅम हळद
१० ग्रॅम लसणाची पावडर
६० ग्रॅम चण्याची डाळ
६० ग्रॅम उडदाची डाळ
१० ग्रॅम हिंग
तळण्यासाठी तेल.
* कृती :-
दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.
डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.
वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.
एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.
सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

२) @ मालवणी मसाला. @
* साहित्य : -
१) १/२ किलो बेडगी मिरची
२) १/२ किलो संकेश्वरी मिरची
३) ५०० ग्राम धणे
४) १२५ ग्राम काळी मिरी
 ५)५० ग्राम दालचिनी
 ६) ५० ग्राम लवंग
 ७) ५० ग्राम जावित्री
 ८) ५० ग्राम चक्रीफुल
९) ५० ग्राम काळी वेलची (मसाला वेलची)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बडीशेप
१२) ५० ग्राम खसखस
१३) ५० ग्राम दगडीफुल
 १४) ५० ग्राम तमालपत्र
 १५) २५ ग्राम वेलची
 १६) अडीच जायफळ
१७) ५० ग्राम अख्खी हळद
१८) ५० ग्राम हिंग
 १९) तेल .
* कृती :-
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात मिरची घालून छान परतावी.
मिरच्या छान खमंग लालसर भाजून घ्याव्यात.
मिरच्या कुरकुरीत भाजल्या कि बाजूला काढून घ्याव्यात.
त्याच भांडयात पुन्हा थोडस तेल घालून हळद , हिंग आणि जायफळ सोडून उरलेले वरील मसाले घालावे.
हावे.
मसाले व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.
हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी.
पूड थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.

३) @ कोल्हापुरी मसाला. @
* साहित्य :-
१) १ वाटी लाल सुक्या मिरच्या
 २) १/२ वाटी सुख खोबर
३) १ चमचा जिरे
४) १ चमचा धणे
५) २ चमचे पांढरे तिळ
६) १ छोटा चमचा मेथीदाणे
७) १ छोटा चमचा मोहरी
८) १ छोटा चमचा काळी मिरी
९) १ छोटा चमचा तेल
१०) १ छोटा चमचा लवंग
११) २ तमालपत्र
१२) १/२ छोटा चमचा जायफळ पूड
१३) २ चमचे लाल तिखट .
* कृती :-
लाल तिखट व जायफळ पूड वगळून वरील सर्व पदार्थ एकत्र करावे.
१/२ चमचा तेल या पदार्थांना चांगले चोळून घ्यावे.
एक भांड गरम करून त्यात हे पदार्थ घालून मध्यम आचेवर थोडेसे गरम करावे.
खमंग भाजल्यावर एक छान सुगंध येईल मिरच्या व इतर पदार्थ थोडयाशा लालसर भाजल्या कि आचेवरून बाजूला करावे.
जास्त काळपट भाजू नयेत.
भाजलेले मसाले ताटात पसरून ठेवावे.
थंड झाले कि मिक्सरला लावून छान पूड करून घ्यावी.
आता लाल तिखट व जायफळ पूड एकत्र करावे.
हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

४) @ ताक मसाला . @
* साहित्य :-
२५० ग्राम आंबट गोड दही
जिरेपूड, धनेपूड
मीठ
थंडगार पाणी.
* कृती :-
सगळ्यात आधी दहयामधे थंडगार पाणी मिसळून रवीने फ़ेस येईपर्यंत मस्त घुसळून घ्यावे. २ चिमूट जिरेपूड, २ चिमूट धनेपूड आणि २ चिमूट मीठ घालून परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!
(आपल्या सिंहगडावरच्या ताकाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही.)

५) @ दुध मसाला. @
* साहित्य :-
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर.
* कृती :-
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.
* टीप :-
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

६) @ मसाला सुपारी .@
* साहित्य :-
बडीशेप - १/४ किलो
धणेडाळ - १/४ किलो
जेष्ठमध पूड - ५० ग्रॅम
ओवा - ५० ग्रॅम
बाळंतशेपा - २५ ग्रॅम
लवंग - ५-६ नग .
* कृती :-
सर्व साहित्य निरनिराळे भाजून घ्यावे. एकत्र करून बारीक दळावे. हवाबंद बरणीत ठेवावे. पाचक आणि आम्लपित्तासाठी उत्तम उपाय.

७) @ गरम मसाला (1). @
* साहित्य :--
२० ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम लवंगा,
२० ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोडे -
सोलून दाणे काढून, ५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जिरे.
* कृती :-
मसाल्याचे सर्व पदार्थ कढईत मंद आचेवर थोडे भाजावेत. सर्व जिन्नस एकत्र बारीक कुटून पूड करून, चाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

८) @ गरम मसाला (2). @
* प्रमाण :- साधारण १/३ कप.
* साहित्य :-
२ टेबलस्पून धणे ,
२ चमचे जिरे,
१ १/२ टेबलस्पून अख्खे मिरीदाणे,
साधारण २० लवंगा
१ दालचिनीचा तुकडा १ १/२ इंच,
३ टेबलस्पून बडिशेप.
* कृती :-
प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालचिनी, बडिशेप आणि मिरे मंद आंचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त लाल होऊ देऊ नये.
त्याच कढईत धणे किंचित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात जिरे घालून गॆस बंद करावा.
या सर्व मसाल्यांची बारीक पूड करावी. आणि गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठेवावा.
या मसाल्यात बडिशेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून मिश्र भाज्यांचा कुर्मा छानच होतो.
* टीपा :-
वर दिलेल्या प्रमाणात साधारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण सारख्याच प्रमाणात वाढवू नये. उदाहरणार्थ, लवंगा जरा जपूनच घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.

९) @ कांदा लसूण मसाला. @
* साहित्य :-
काळया मसाल्यात सांगितलेले सर्व मसाल्याचे पदार्थ, लाल सुक्या मिरच्या २०० ग्रॅम, अर्धा किलो कांदे, अदपाव लसूण.
* कृती :-
काळया मसाल्याप्रमाणे सर्व जिन्नस तेलात खमंग भाजून घ्यावेत. सुक्या मिरच्या तेलात तळून मीठ घालून कुटून त्यात मिसळाव्यात. कांदे पातळ उभे चिरून उन्हात चुरचुरीत वाळवावेत. नंतर थोडया तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलून परतून घ्यावा व कांदा - लसूण कुटून तीळ खोबर्‍याच्या पुडीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

१०) @ बिर्याणी मसाला. @
* साहित्य :-
१ चमचा धणे
१ चमचा जिरे
१ चमचा शहाजिरे
१ चमचा बडीशेप
१० हिरवे वेलदोडे
१ काळा वेलदोडा
१-२ जायपत्री
३ इंच दालचीनीचा तुकडा
 २ बदामफूले
१ जायफळ
२-३ जावित्री
१०-१५ मिरे
३ लवंगा .
* कृती :-
जायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

११) @ बिर्याणी / पुलाव मसाला. @
* साहित्य :-
जिरे - १ चमचा
धणे - १ चमचा
तेजपत्ता - ५-६ पाने
काळे मिरे - १०-१२ नग
बदामफुल - १ नग
सुकी लाल मिरची - ४-५ नग
वेलदोडे - ३-४ नग
लवंग - ८-१० नग
शहाजिरे - १ चमचा
जायफळ पूड - १/४ चमचा
केशर - ५-६ काड्या
मसाला वेलदोडे - ३-४ नग
खडे मीठ - १ चमचा
दालचिनी - १ इंचाचे २ तुकडे
खसखस - २ चमचे .
* कृती :-
सर्व साहित्य कडकडीत उन्हात नीट कोरडे वाळवून एकत्र करून एकजीव बारीक पूड करावी.

१२) @ सातपाटी मसाला / मासे मसाला. @
* साहित्य :-
ओला नारळाचा चव - २ वाट्या
तांदूळ पिठी - २ चमचे
लिंबूरस - ६ चमचे
धणेपूड - २ चमचे
बडीशेप पूड - १ चमचा
लाल मिरची पेस्ट - १/२ वाटी
हिरवी मिरची आणि कोथिम्बिर पेस्ट - १ वाटी
हळद - १/२ चमचा
मीठ - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे. हा मसाला लवकर संपवावा, फार दिवस टिकत नाही. मासे बनविण्यासाठी हा मसाला चांगला.

१३) @ राजस्थानी गरम मसाला .@
* साहित्य :-
तेजपत्ता - ७-८ पाने
काळे मिरे - १ चमचा
दालचिनी - ३-४ बोटभर लांबीचे तुकडे
लवंग - १ चमचा
जायफळ - १/२ नग .
* कृती :-
सर्व पदार्थ कोरडेच एकत्र करून बारीक कुटावेत.

१४) @ पिझ्झा मसाला .@
* साहित्य : -
सुंठपूड - १/४ चमचा
खनिज मीठ / सैंधव - १ चमचा
मीठ - १ चमचा
रोझमरी / गुलाबकळी - १ चमचा
भरड कुटलेली सुकी लाल मिरची - २ चमचे
थाइम - १ चमचा
ओरेगानो - ४ चमचे
बेझील लीव्ज - ४
लसूण पावडर - १ चमचा
सायट्रिक असिड - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र कालवावे, चुरून एकजीव करावे. हवाबंद बरणीत ठेवावे.

१५) @ सोलापुरी काळा मसाला .@
* साहित्य :-
लाल सुकी मिरची - १ किलो
खडा हिंग - १ छोटा चमचा
सुंठ - २५ ग्रॅम
दालचिनी - १० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम
हळकुंड - २५ ग्रॅम
काळे मिरे - १० ग्रॅम
नाकेशर - २५ ग्रॅम
दगडफूल - २५ ग्रॅम
तमालपत्र - २५ ग्रॅम
रामपत्री - २५ ग्रॅम
बदामफुल - २५ ग्रॅम
शहाजिरे - १५ ग्रॅम
धणे - २५० ग्रॅम
मोहरी - १५ ग्रॅम
खसखस - १५ ग्रॅम
मसाला वेलदोडे - १० ग्रॅम
खोबरे खीस - २५० ग्रॅम
खडे मीठ - १२५ ग्रॅम .
* कृती :-
सर्व मसाले आणि मिरच्या तेलावर भाजून गार करावे. शहाजिरे आणि मीठ घालून कुटावे.
तेलावर भाजण्याचा क्रम - हिंग, फोडलेले हळकुंड, फोडलेली सुंठ, मोहरी, लवंग, मिरे, नाकेशर, दगडफूल, बदामफुल, तमालपत्र, रामपत्री, धणे
खोबरे आणि खसखस तेल न घालता भाजावे. सर्वात शेवटी थोडे थोडे तेल टाकीत मिरच्या भाजाव्यात.

१६) @ पाणीपुरी मसाला / चाट मसाला. @
* साहित्य :-
मीठ - १ चमचा
खनिज मीठ / सैंधव - २ चमचे
लाल तिखट - १/२ चमचा
आमचूर पावडर - २ चमचे
जिरे पूड - १ चमचा
सुंठ पूड - १ चमचा
काळी मिरी पूड - १/२ चमचा
बडीशेप पूड - १ चमचा
शहाजिरे पूड - १/४ चमचा .
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे, हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.

१७) * चाट मसाला :-
* साहित्य :-
५० ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे,
२० ग्रॅम बडीशेप, १५ ग्रॅम काळी मिरी,
१० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे,
२ग्रॅम दालचिनी, २ ग्रॅम लवंगा,
१० ग्रॅम सूंठ पावडर, ५० ग्रॅम आमचूर पावडर,
१० ग्रॅम मिरची पावडर, ५ ग्रॅम हिंग,
१२५ ग्रॅम साधे मीठ, १ टेबल स्पून काळे मीठ,
१०-१२ वेलची, २ तमालपत्रे,
२५ ग्रॅम सुकी पुदिन्याची पाने, बारिक तुकडा जायफळ,
१ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड.
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे.

१८) @ वैदर्भीय मसाला .@
* साहित्य :-
२५० ग्रॅम धणे, २५ ग्रॅम जिरे, ५ ग्रॅम लवंगा,
५ ग्रॅम दालचिनी, ५ ग्रॅम नागकेशर,
५ ग्रॅम मिरे, ५ ग्रॅम दगडफूल, ५ ग्रॅम तमालपत्र,
५ ग्रॅम जायपत्री, १ जायफळ, २५ ग्रॅम खसखस,
५० ग्रॅम खोबरे, ५० ग्रॅम तीळ, ५० ग्रॅम चणाडाळ.
* कृती :- सर्व साहित्य तेलावर भाजून वाटावे.

१९) @ कोकणी मसाला .@
* साहित्य :-
५०० ग्रॅम धणे, ५०० ग्रॅम मिरच्या, ५० ग्रॅम लवंग,
५० ग्रॅम जायपत्री, ५० ग्रॅम नागकेशर,
५० ग्रॅम मसाला वेलची, ५० ग्रॅम दालचिनी,
५० ग्रॅम दगडफूल, ५० ग्रॅम तमालपत्र, ५० ग्रॅम बडीशेप,
५० ग्रॅम काळे मिरे, ५० ग्रॅम जिरे, ५०ग्रॅम शहाजिरे,
५० ग्रॅम मोहरी, २०० ग्रॅम खसखस, १५ हळकुंडे,
१ चमचा मेथी, १ टेबलस्पून हिंग, २ जायफळे.
* कृती :- सर्व साहित्य तेलावर भाजून वाटावे.

२०) @ गोडा मसाला. (काळा मसाला). @
* साहित्य :-
धणे अर्धा किलो, सुके खोबरे पाव किलो, तीळ पाव किलो, खसखस 50 ग्रॅम, हळकुंडे 50 ग्रॅम, प्रत्येकी 20 ग्रॅम लवंग, दालचिनी, शहाजिरे, काळे मिरे, तमालपत्र, मसाला वेलदोडे, दगडफूल, खडा हिंग, प्रत्येकी 10 ग्रॅम जायपत्री, बाद्यान (बदामफूल), जिरे 100 ग्रॅम.
* कृती :-
खोबरे तुकडे करून वा किसून भाजून घ्या. तीळ कोरडेच भाजून घ्या. बाकीचे सर्व पदार्थ थोड्या तेलावर वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक पूड करा. चाळून घट्ट झाकणाऱ्या बरणीत भरा.

२१) @ पंजाबी गरम मसाला. @
* साहित्य :-
1 टी स्पून धणे, अर्धा टी स्पून जिरे, 1 टी स्पून शहाजिरे,
4 ते 5 तमालपत्रे, अर्धा टी स्पून दालचिनी,
अर्धा टी स्पून काळे मिरे, अर्धा टी स्पून लवंग,
5 मसाला वेलदोडे व पाव जायफळ.
* कृती :-
जायफळ सोडून सर्व मसाला कोरडाच भाजून घ्या. (फार भाजू नका.) नंतर जायफळासहित मिक्‍सरवर पूड करून घ्या.
* टीप :- हा मसाला एकदम जास्त प्रमाणात न करता लागेल तसा थोडाच करावा.

२२) @ कच्चा मसाला. @
* साहित्य :-
अर्धी वाटी धणे, पाव वाटी जिरे, 5 ग्रॅम शहाजिरे,
5 ग्रॅम लवंग व दालचिनीचा 1 छोटा तुकडा.
* कृती :-
सर्व साहित्य कच्चेच मिक्‍सरवर बारीक करून घ्यावे व ही पूड मसालेभात व खिचडी यासाठी वापरावी.

२३) @ पावभाजी मसाला. @
* साहित्य :-
लाल सुक्‍या मिरच्या 50 ग्रॅम, धणे 50 ग्रॅम,
15-20 हिरवे वेलदोडे, 15-20 लवंगा,
7-8 तमालपत्रे, जिरे 20 ग्रॅम, काळे मिरे 10 ग्रॅम,
बडीशेप 20 ग्रॅम, आमचूर पावडर चार टी स्पून,
काळे मीठ 2 टी स्पून, हळद 2 टी स्पून,
सुंठ पावडर 2 टी स्पून.
* कृती :-
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. मिरच्या थोड्या तेलावर भाजून घ्या. गार झाल्यानंतर एकत्र करून बारीक करून घ्या व कोरड्या स्वच्छ बरणीत भरून ठेवा. (कधी कधी बदल म्हणून नेहमीच्या भाज्यांमध्येही वापरता येतो.
२४) @ चाट मसाला. @
* साहित्य :-
दोन टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 2 टेबलस्पून काळे मिरे, 2 टेबलस्पून बडीशेप, अर्धा टी स्पून हिंग पूड, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, 2 टी स्पून काळे मीठ, चवीनुसार साधे मीठ.
* कृती :-
हिंगपूड थोडी तेलावर परतून घ्या. बाकी सर्व पावडरी सोडून इतर साहित्य किंचित भाजून घ्या व एकत्र करून गार झाल्यावर मिक्‍सरवर बारीक करा. (फ्रूटचाट अगर सॅलडसाठी वापरा.)

२५) @ छोल्यासाठी गरम मसाला .@
* साहित्य :-
दहा हिरवे वेलदोडे, दीड टी स्पून शहाजिरे,
एक टी स्पून जिरे, दीड टी स्पून मिरे,
अर्धा टी स्पून लवंगा, दोन तुकडे दालचिनी,
एक तमालपत्र, पाव टी स्पून सुंठ पावडर.

२६) @ सिंधी गरम मसाला . @
* साहित्य :-
शंभर गॅम मिरे, शंभर गॅम जिरे, शंभर गरग्रॅम दालचिनी,
पन्नास ग्रॅम लवंग, पन्नास ग्रॅम वेलची, पाच तमालपत्र पाने.
*कृती :- सर्व कच्चे कुटून घेणे.

२७) @ धनशाक मसाला .@
* साहित्य :-
[पाव किलो डाळीसाठी] एक टी स्पून मेथी,
एक टी स्पून जिरे, एक टी स्पून फुटाणे,
एक टी स्पून सांबार मसाला, एक टी स्पून मिरी पावडर,
एक टी स्पून लसूण पेस्ट, चार-पाच तुकडे दालचिनी,
तीन लाल मिरच्या, एक ते दीड टी स्पून गरम मसाला.

२८) @ रसम मसाला .@
* साहित्य :-
सात-आठ लाल मिरच्या आणि अर्धा टी स्पून हिंग चमचाभर, तेलावर थोडे परतवून घ्यावे. त्याच कढईत पाव वाटी धणे,
एक टी स्पून जिर, एक टी स्पून मिरी, एक टी स्पून हरभरा- डाळ, तीन टी स्पून तूरडाळ, पाव टी स्पून हळद,
चार-पाच वाललेली कधीलिंबाची पाने.
* कृती :- परतविन गार झाल्यावर पावडर करावी.

२९) @ लिंबू लोणच्याचा मसाला .@
* साहित्य / कृती :-
एक टी स्पून मेथी, आणि एक टी स्पून हिंग,
दोन -तीन टी स्पून तेलावर परतावे. त्यात दोन टी स्पून तिखट, एक टी स्पून हळद घालुन मिक्सरवर दळावे. पावा वाटी गरम करून गार केलेल्या तेलात वरील मसाला व आठ चमचे मीठ घालावे. [ दहा लिंबाच्या फोडी मिसळाव्या.]

३०) @ मिरचीच्या लोणच्याचा मसाला .@
* साहित्य :-
एक टी स्पून मेथी पावडर, एक टी स्पून हिंग पावडर, एक टी स्पून हळद आणि अर्धी वाटी मोहरीची डाळ यांच भरडसर मिश्रण, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी लिंबाचा रस.
* कृती :- कोमट तेलात सर्व मसाला मिसळून घ्यावा.[ पाव किलो मिरच्या चिरून त्यात वरील मिश्रण मिसळावे. ]

३१) @ कैरी लोणचे मसाला .@
* साहित्य / कृती :-
एक टे स्पून मेथी, एक टे.स्पून हिंग थोड्या तेलावर परतवून घ्यावे. त्यात पाऊण वाटी मोहरी डाळ, एक वाटी लाल तिखट, एक टे. स्पून हळद मिसळवून सर्व मसाला कालवावा. [ एक किलो कैरीच्या फोडी त्यात मिसळाव्या.]

३२) @ करी पावडर .@
* साहित्य :-
शंभर ग्रॅम धणे, पन्नास ग्रॅम सुक्या मिरच्या, पंचवीस ग्रॅम मिरे, दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून जिरे, दोन टी स्पून शहाजिरे, दोन टी स्पून चणाडाळ, एक टी. स्पून मोहरी, दोन टी.स्पून तीळ, सात आठ लवंगा, सात-आठ वेलदोडे, पाच-सहा दालचिनीचे तुकडे.
* कृती :- सर्व एकत्र कुटावे.

३३) @ थंडाई मसाला .@
* साहित्य / कृती :-
दोन टी स्पून खसखस, दोन टी स्पून मगज, चार-पाच हिरवे वेलदोडे, चार टीस्पून बडीशेप, दहा-बारा बदाम, एक वाटी गुलाबाच्या सुक्या पाकळ्या, एक टी स्पून मिरे. हे सर्व पदार्थ एक वाटी पाण्यात भिजत घालून मग वाटावे. [ दोन लिटर: दूधासाठी ]

३४) @ तंदूरी मसाला. @
* साहित्य / कृती :-
अर्धा टी स्पून सुंठ पावडर, अर्धा टी स्पून आमचूर, दोन ती स्पून लाल तिखट, एक टी स्पून शहाजिर, दोन-तीन दालचिनी तुकडे, सात-आठ लवंगा, तीन चार मसाला वेलदोडे, एक टी स्पून त्यार गरम मसाला, अर्धा टी स्पून पुदीना पावडर.

३५) @ चहा मसाला(1) @
पावसाळ्यात किंवा थंडीत हा चहाचा मसाला (Tea Masala) घालून चहा करावा.
* साहित्य :-
२५ ग्रॅम काळी मिरी
२ टी.स्पून सूंठ पूड
७-८ लवंगा
२-३ दालचिनीच्या काड्या
२-३ वेलदोडे
२-३ बडी वेलची.
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करुन बारीक कुटावे व चाळुन ठेवावे.
पावसाळ्यात किंवा थंडीत हा मसाला घालून चहा करावा.

३६) @ चहा मसाला(2)@
* साहित्य :-
४० वेलची (हिरवी)
२५ काळी मिरी
१५ ते १८ लवंग
५ काड्या दालचिनी (२ इंच प्रत्येकी)
१ टेस्पून सुंठ पावडर
३/४ जायफळ, किसलेले.
* कृती :-
१) वेलची सोलून घ्यावी. दालचिनी हाताने तुकडे करून घ्यावी.
२) सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करावे.
* वापर :-
४ कप चहासाठी दीड ते दोन टिस्पून मसाला वापरावा. चहा पावडरबरोबरच हा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल.
* टीपा :-
१) काळीमिरी, वेलची, दालचिनी आणि सुंठ यांची फ्रेश पावडर वापरूनही मसाला बनवू शकतो. जर दालचिनीचा स्वाद आवडत असेल तर ती थोडी जास्त घालावी.
२) चहाच्या मसाल्यात वाळवलेली चहाची पाती, बडीशेप आणि थोड्याशाच प्रमाणात चक्रीफूल घालू शकतो.
३) वेलची न सोलता वापरली तरी चालेल.

३७) @ चहा मसाला(3)@
* साहित्य :-
अर्धा कप पेक्षा थोडं जास्त पाणी
अर्धा कप दुध
१ १/४ चमचा चहा पावडर
१ १/२ चमचा साखर
आल्याचा अर्धा सें.मी होईल एवढा तुकडा ठेचून
२ -३ काळी मिरी
२ लवंग
छोटासा दालचिनीचा तुकडा
वेलची (पूड )
* कृती :-
भांड्यात पाणी घेऊन ते गरम होऊ द्या..
थोडा पाणी तापलं कि त्यामध्ये चहा पावडर , मद साखर मग आलं, लवंग , दालचिनी, वेलची आणि वाटल्यास काळी मिरी घाला.
चहा उकळला कि मग त्यामध्ये दुध घालून त्याला उकळी फुटू द्या, म्हणजे चहा ला कच्च्या दुधाचा वास नाही येणार.
मस्त पैकी गाळून घ्या..आणि एनजोय करा..!!!
* टीप : - तुम्हाला दुधातला चहा आवडत असेल, तर दुधाचं प्रमाण जास्त घ्यावं.

     धन्यवाद,
     खुशालसिंग परदेशी.“घरगुती मसाले”

      सन्माननीय सदस्य “Bhople M Deepak” यांच्या विनंतीवरुन..........

      त्यांच्या स्वादान्न ग्रुपवरील याच विनंतीवरुन अाॅगष्टच्या शेवटी मी ही पोस्ट स्वादान्न ग्रुपवर टाकली होती. कदाचीत त्यांच्या लक्षात आले नसेल म्हणुन त्यांनी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर पुन्हा विनंती केली अाहे. “sir pls whars app me All masale recipe to me”. त्यावरुन १७ सप्टेबर २०१७ रोजी “Marathi स्वयंपाक व इतर पदार्थ” या ग्रुपवर तीच पोस्ट परत टाकली आहे. अाता आज २६ सप्टेबर २०१७ रोजी  तिसऱ्यांदा त्यांनी “आम्ही सारे खवैय्ये” या ग्रुपवरुन सेम मागणी केली आहे म्हणुन तिच पोस्ट परत या ग्रुपवर टाकत आहे. अाता तरी त्यांनी हि पोस्ट काॅपी करुन ठेवावी. किंवा परत ही मागणी करु नये. दुसरे महत्वाचे म्हणजे हे मसाले माझे नसल्याने यावरील सर्वच शंकाचे निरसन मी करु शकेलच असे नाही.

(विनोद सावंत यांचे विवीध प्रकारचे ३७ घरगुती मसाले काॅपी पेस्ट करुन टाकत आहे.)

मसाले (३७) विनोद सावंत यांचे खास मसाले रेसिपीज ( सावंत यांचा लालबाग ला मोठा व्यवसाय आहे मसाल्यांचा )
# विविध प्रकारचे घरगुती मसाले. #

१) @ सांभर मसाला. @
सांभर करायच्या वेळीच हा सांभर मसाला (Sambhar Masala) ताजाच केला तरी चव अजून छान लागते.
* साहित्य :-
१२० ग्रॅम धणे
८० ग्रॅम जीरे
३० ग्रॅम काळी मिरी
३० ग्रॅम सरसो
३० ग्रॅम मेथी
२० ग्रॅम अख्खी लाल मिरची
३० ग्रॅम हळद
१० ग्रॅम लसणाची पावडर
६० ग्रॅम चण्याची डाळ
६० ग्रॅम उडदाची डाळ
१० ग्रॅम हिंग
तळण्यासाठी तेल.
* कृती :-
दोन्ही डाळी धुवून वाळवून घ्या. कढईत तेल टाकून डाळी सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्या.
डाळी कागदावर टाकून जास्तीचे तेल काढून घ्या.
वरील इतर सामग्री तेलात गरम करुन सर्व एकत्र कुटावे.
एका स्वच्छ व कोरड्या डब्यात भरुन ठेवावा.
सांभर करायच्या वेळीच हा मसाला ताजाच केला तरी चव अजून छान लागते.

२) @ मालवणी मसाला. @
* साहित्य : -
१) १/२ किलो बेडगी मिरची
२) १/२ किलो संकेश्वरी मिरची
३) ५०० ग्राम धणे
४) १२५ ग्राम काळी मिरी
 ५)५० ग्राम दालचिनी
 ६) ५० ग्राम लवंग
 ७) ५० ग्राम जावित्री
 ८) ५० ग्राम चक्रीफुल
९) ५० ग्राम काळी वेलची (मसाला वेलची)
१०) ५० ग्राम मोहरी
११)५० ग्राम बडीशेप
१२) ५० ग्राम खसखस
१३) ५० ग्राम दगडीफुल
 १४) ५० ग्राम तमालपत्र
 १५) २५ ग्राम वेलची
 १६) अडीच जायफळ
१७) ५० ग्राम अख्खी हळद
१८) ५० ग्राम हिंग
 १९) तेल .
* कृती :-
एका भांडयात थोडस तेल गरम करून त्यात मिरची घालून छान परतावी.
मिरच्या छान खमंग लालसर भाजून घ्याव्यात.
मिरच्या कुरकुरीत भाजल्या कि बाजूला काढून घ्याव्यात.
त्याच भांडयात पुन्हा थोडस तेल घालून हळद , हिंग आणि जायफळ सोडून उरलेले वरील मसाले घालावे.
हावे.
मसाले व मिरच्या एका प्लेटमध्ये बाजूला काढून थंड होऊ दयावे.
हे मिश्रण थंड झाले कि मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यावी.
पूड थंड झाली कि बरणीमध्ये भरून ठेवावी.

३) @ कोल्हापुरी मसाला. @
* साहित्य :-
१) १ वाटी लाल सुक्या मिरच्या
 २) १/२ वाटी सुख खोबर
३) १ चमचा जिरे
४) १ चमचा धणे
५) २ चमचे पांढरे तिळ
६) १ छोटा चमचा मेथीदाणे
७) १ छोटा चमचा मोहरी
८) १ छोटा चमचा काळी मिरी
९) १ छोटा चमचा तेल
१०) १ छोटा चमचा लवंग
११) २ तमालपत्र
१२) १/२ छोटा चमचा जायफळ पूड
१३) २ चमचे लाल तिखट .
* कृती :-
लाल तिखट व जायफळ पूड वगळून वरील सर्व पदार्थ एकत्र करावे.
१/२ चमचा तेल या पदार्थांना चांगले चोळून घ्यावे.
एक भांड गरम करून त्यात हे पदार्थ घालून मध्यम आचेवर थोडेसे गरम करावे.
खमंग भाजल्यावर एक छान सुगंध येईल मिरच्या व इतर पदार्थ थोडयाशा लालसर भाजल्या कि आचेवरून बाजूला करावे.
जास्त काळपट भाजू नयेत.
भाजलेले मसाले ताटात पसरून ठेवावे.
थंड झाले कि मिक्सरला लावून छान पूड करून घ्यावी.
आता लाल तिखट व जायफळ पूड एकत्र करावे.
हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

४) @ ताक मसाला . @
* साहित्य :-
२५० ग्राम आंबट गोड दही
जिरेपूड, धनेपूड
मीठ
थंडगार पाणी.
* कृती :-
सगळ्यात आधी दहयामधे थंडगार पाणी मिसळून रवीने फ़ेस येईपर्यंत मस्त घुसळून घ्यावे. २ चिमूट जिरेपूड, २ चिमूट धनेपूड आणि २ चिमूट मीठ घालून परत घुसळा. मसाला ताक तय्यार!!!
(आपल्या सिंहगडावरच्या ताकाची आठवण झाल्यावाचून राहणार नाही.)

५) @ दुध मसाला. @
* साहित्य :-
२ कप दुध
३ टेस्पून साखर
मसाल्यासाठी साहित्य:
१/४ कप बदामाची पूड
१ टेस्पून पिस्ता पूड
१/२ टिस्पून वेलचीपूड
चिमूटभर जायफळ पूड
१ चिमूटभर केशर.
* कृती :-
१) मसाला बनवताना न खारवलेले पिस्ता आणि बदाम वापरावेत. त्याची पूड करावी. बदाम पिस्ता पूड, वेलची आणि जायफळ पूड आणि केशर एकत्र मिक्सरवर एकत्र करून घ्यावेत.
२) २ कप दूध गरम करावे. त्यात ३ टेस्पून किंवा आवडीनुसार साखर घालावी. बनवलेला २-३ टिस्पून मसाला घालून ढवळावे. थोडे उकळू द्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.
* टीप :-
१) मसाला बनवताना इतरही सुकामेवा आवडीनुसार वापरू शकतो.
२) यामध्ये अख्ख्या चारोळ्याही घालू शकतो.
३) मसाल्यात जायफळ प्रमाणातच वापरावे. कारण मसाला दुधाला जायफळाचा जास्त फ्लेवर आला तर ते उग्र लागते.

६) @ मसाला सुपारी .@
* साहित्य :-
बडीशेप - १/४ किलो
धणेडाळ - १/४ किलो
जेष्ठमध पूड - ५० ग्रॅम
ओवा - ५० ग्रॅम
बाळंतशेपा - २५ ग्रॅम
लवंग - ५-६ नग .
* कृती :-
सर्व साहित्य निरनिराळे भाजून घ्यावे. एकत्र करून बारीक दळावे. हवाबंद बरणीत ठेवावे. पाचक आणि आम्लपित्तासाठी उत्तम उपाय.

७) @ गरम मसाला (1). @
* साहित्य :--
२० ग्रॅम काळे मिरे, १० ग्रॅम लवंगा,
२० ग्रॅम दालचिनी, १५ ग्रॅम मसाला वेलदोडे -
सोलून दाणे काढून, ५ ग्रॅम शहाजिरे, १० ग्रॅम जिरे.
* कृती :-
मसाल्याचे सर्व पदार्थ कढईत मंद आचेवर थोडे भाजावेत. सर्व जिन्नस एकत्र बारीक कुटून पूड करून, चाळून घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी.

८) @ गरम मसाला (2). @
* प्रमाण :- साधारण १/३ कप.
* साहित्य :-
२ टेबलस्पून धणे ,
२ चमचे जिरे,
१ १/२ टेबलस्पून अख्खे मिरीदाणे,
साधारण २० लवंगा
१ दालचिनीचा तुकडा १ १/२ इंच,
३ टेबलस्पून बडिशेप.
* कृती :-
प्रथम एका स्वच्छ कोरड्या कढईत लवंग, दालचिनी, बडिशेप आणि मिरे मंद आंचेवर खमंग वास सुटेपर्यंत भाजावे व बाजुला काढावे. जास्त लाल होऊ देऊ नये.
त्याच कढईत धणे किंचित तांबुस होईस्तोवर भाजावेत मग त्यात जिरे घालून गॆस बंद करावा.
या सर्व मसाल्यांची बारीक पूड करावी. आणि गार झाल्यावर घटट झाकणाच्या बाटलीत मसाला भरून ठेवावा.
या मसाल्यात बडिशेप असल्याने कुठल्याही भाजीला एक छान स्वाद येतो. हा मसाला वापरून मिश्र भाज्यांचा कुर्मा छानच होतो.
* टीपा :-
वर दिलेल्या प्रमाणात साधारण १/३ कप मसाला होतो. जास्त प्रमाणात करताना त्यातल्या सर्व मसाल्यांचे प्रमाण सारख्याच प्रमाणात वाढवू नये. उदाहरणार्थ, लवंगा जरा जपूनच घालाव्यात. नाहीतर मसाला खूप उग्र/जळजळीत होऊ शकतो.

९) @ कांदा लसूण मसाला. @
* साहित्य :-
काळया मसाल्यात सांगितलेले सर्व मसाल्याचे पदार्थ, लाल सुक्या मिरच्या २०० ग्रॅम, अर्धा किलो कांदे, अदपाव लसूण.
* कृती :-
काळया मसाल्याप्रमाणे सर्व जिन्नस तेलात खमंग भाजून घ्यावेत. सुक्या मिरच्या तेलात तळून मीठ घालून कुटून त्यात मिसळाव्यात. कांदे पातळ उभे चिरून उन्हात चुरचुरीत वाळवावेत. नंतर थोडया तेलात परतून घ्यावेत. लसूणपण सोलून परतून घ्यावा व कांदा - लसूण कुटून तीळ खोबर्‍याच्या पुडीबरोबर मसाल्यात घालावेत. मसाला एकजीव कालवून घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.

१०) @ बिर्याणी मसाला. @
* साहित्य :-
१ चमचा धणे
१ चमचा जिरे
१ चमचा शहाजिरे
१ चमचा बडीशेप
१० हिरवे वेलदोडे
१ काळा वेलदोडा
१-२ जायपत्री
३ इंच दालचीनीचा तुकडा
 २ बदामफूले
१ जायफळ
२-३ जावित्री
१०-१५ मिरे
३ लवंगा .
* कृती :-
जायफळ सोडून वरील सर्व मसाल्याचे पदार्थ वेगवेगळे भाजून घ्यावेत. मंद आचेवर, त्यांतील नैसर्गिक तेले बाहेर येईपर्यंतच हलकेसे भाजावेत. सगळे एकत्र करून, गार झाल्यावर बारीक दळावेत व पूड हवाबंद डब्यात भरून ठेवावी.

११) @ बिर्याणी / पुलाव मसाला. @
* साहित्य :-
जिरे - १ चमचा
धणे - १ चमचा
तेजपत्ता - ५-६ पाने
काळे मिरे - १०-१२ नग
बदामफुल - १ नग
सुकी लाल मिरची - ४-५ नग
वेलदोडे - ३-४ नग
लवंग - ८-१० नग
शहाजिरे - १ चमचा
जायफळ पूड - १/४ चमचा
केशर - ५-६ काड्या
मसाला वेलदोडे - ३-४ नग
खडे मीठ - १ चमचा
दालचिनी - १ इंचाचे २ तुकडे
खसखस - २ चमचे .
* कृती :-
सर्व साहित्य कडकडीत उन्हात नीट कोरडे वाळवून एकत्र करून एकजीव बारीक पूड करावी.

१२) @ सातपाटी मसाला / मासे मसाला. @
* साहित्य :-
ओला नारळाचा चव - २ वाट्या
तांदूळ पिठी - २ चमचे
लिंबूरस - ६ चमचे
धणेपूड - २ चमचे
बडीशेप पूड - १ चमचा
लाल मिरची पेस्ट - १/२ वाटी
हिरवी मिरची आणि कोथिम्बिर पेस्ट - १ वाटी
हळद - १/२ चमचा
मीठ - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे. हा मसाला लवकर संपवावा, फार दिवस टिकत नाही. मासे बनविण्यासाठी हा मसाला चांगला.

१३) @ राजस्थानी गरम मसाला .@
* साहित्य :-
तेजपत्ता - ७-८ पाने
काळे मिरे - १ चमचा
दालचिनी - ३-४ बोटभर लांबीचे तुकडे
लवंग - १ चमचा
जायफळ - १/२ नग .
* कृती :-
सर्व पदार्थ कोरडेच एकत्र करून बारीक कुटावेत.

१४) @ पिझ्झा मसाला .@
* साहित्य : -
सुंठपूड - १/४ चमचा
खनिज मीठ / सैंधव - १ चमचा
मीठ - १ चमचा
रोझमरी / गुलाबकळी - १ चमचा
भरड कुटलेली सुकी लाल मिरची - २ चमचे
थाइम - १ चमचा
ओरेगानो - ४ चमचे
बेझील लीव्ज - ४
लसूण पावडर - १ चमचा
सायट्रिक असिड - १/२ चमचा .
* कृती :-
सर्व साहित्य एकत्र कालवावे, चुरून एकजीव करावे. हवाबंद बरणीत ठेवावे.

१५) @ सोलापुरी काळा मसाला .@
* साहित्य :-
लाल सुकी मिरची - १ किलो
खडा हिंग - १ छोटा चमचा
सुंठ - २५ ग्रॅम
दालचिनी - १० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम
हळकुंड - २५ ग्रॅम
काळे मिरे - १० ग्रॅम
नाकेशर - २५ ग्रॅम
दगडफूल - २५ ग्रॅम
तमालपत्र - २५ ग्रॅम
रामपत्री - २५ ग्रॅम
बदामफुल - २५ ग्रॅम
शहाजिरे - १५ ग्रॅम
धणे - २५० ग्रॅम
मोहरी - १५ ग्रॅम
खसखस - १५ ग्रॅम
मसाला वेलदोडे - १० ग्रॅम
खोबरे खीस - २५० ग्रॅम
खडे मीठ - १२५ ग्रॅम .
* कृती :-
सर्व मसाले आणि मिरच्या तेलावर भाजून गार करावे. शहाजिरे आणि मीठ घालून कुटावे.
तेलावर भाजण्याचा क्रम - हिंग, फोडलेले हळकुंड, फोडलेली सुंठ, मोहरी, लवंग, मिरे, नाकेशर, दगडफूल, बदामफुल, तमालपत्र, रामपत्री, धणे
खोबरे आणि खसखस तेल न घालता भाजावे. सर्वात शेवटी थोडे थोडे तेल टाकीत मिरच्या भाजाव्यात.

१६) @ पाणीपुरी मसाला / चाट मसाला. @
* साहित्य :-
मीठ - १ चमचा
खनिज मीठ / सैंधव - २ चमचे
लाल तिखट - १/२ चमचा
आमचूर पावडर - २ चमचे
जिरे पूड - १ चमचा
सुंठ पूड - १ चमचा
काळी मिरी पूड - १/२ चमचा
बडीशेप पूड - १ चमचा
शहाजिरे पूड - १/४ चमचा .
* कृती :- सर्व एकत्र करून एकजीव दळून घ्यावे, हवाबंद बाटलीत भरून ठेवावे.

१७) * चाट मसाला :-
* साहित्य :-
५० ग्रॅम जिरे, २५ ग्रॅम धणे,
२० ग्रॅम बडीशेप, १५ ग्रॅम काळी मिरी,
१० ग्रॅम ओवा, १५ ग्रॅम अनार दाणे,
२ग्रॅम दालचिनी, २ ग्रॅम 

Monday, 28 May 2018

भिऊ नका शनिदेव मित्र आहेत

भिऊ नका शनिदेव मित्र आहेत

साडेसाती माहिती आणि
श्रीशनि पालट  माहिती.....

पौष कृ. १४ दि २६-०१-२०१७ रोजी
गुरूवारी सायंकाळी ०७:२९  वाजता श्रीशनि महाराज धनु राशीत प्रवेश करत आहेत त्याचा पुण्यकाल गुरूवारी सायं ०४:३५ ते रात्री १०:२३ पर्यंत आहे.

या लेखात आपण साडेसाती म्हणजे काय? आणि साडेसाती मध्ये बारा राशीना शनि महाराज कसे फल देतात साडेसाती मध्ये आपण कोणते उपाय करावेत हे या लेखात पाहू

ज्योतिष आकाश पुराणिक हा लेख माझ्या नावासह facebook आणि whatapp वर पोस्ट करवा श्रीशनि महाराजानां प्रामाणिकपणा अत्यंत प्रिय आहे.

साडेसाती

सतत अडचणी येऊ लागल्या ,की नकळत आपल्या तोंडातून  निघते की काय साडेसाती लागलीय .... कधी संपणार कोणास ठाऊक... ????

अनेकांनी मला साडेसाती म्हणजे नक्की काय अशी विचारणा केली. आणि हा प्रश्न आगदी रास्त आहे.
‘साडेसाती’ म्हणजे सरळ अर्थाने बघू गेल्यास एकूण साडेसात वर्षाचा कालावधी. ‘साडेसाती’ या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असल्यास प्रथम प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतून होणारे भ्रमण म्हणजे काय हे ही समजून घेणे आवश्यक आहे. या लेखात मी हे सोप्या भाषेत परंतू ढोबळमानाने समजावून द्यायचा प्रयत्न करेन.

सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाचा सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा / फिरण्याचा एक ठराविक कालावधी असतो. हा कालावधी सूर्याभोवतीच्या ३६० अंशात (गोलाकार) मेष ते मीन अशा बारा राशीत विभागलेला आहे. सूर्याभोवती भ्रमण करताना हे सर्व ग्रह वर्षाला ह्या बारा राशीतून भ्रमण करतात अशी कल्पना केली आहे. प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती भ्रमण करण्याची कक्षा वेगवेगळी असल्याने आणि प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून ठराविक अंतरावर असल्याने, प्रत्येक ग्रहाचा प्रत्येक राशीतून सूर्याभोवती भ्रमण करण्याचा कालावधीही साहजिकच वेगवेगळा आहे. आपण राशी शिकलो नसलो तरी सुर्य/ग्रहमाला आपण पूर्वी कधीतरी शाळा-कॉलेजात शिकलो आहे त्यामुळे हे लक्षात येईल.

चंद्राचं भ्रमण –
चंद्र हा जरी पृथ्वीचा उपग्रह असला तरी चंद्राला ज्योतीषशास्त्राने ग्रह मानला आहे आणि भ्रमणाचा सर्वात कमी कालावधी चंद्राचा आहे. चंद्र स्वतःभोवती व पृथ्वीभोवती भ्रमण करत असतो हे सर्वांनाच माहित आहे. पृथ्वी जसजशी सूर्याभोवती भ्रमण करते तसा पृथ्वीसोबत चंद्रही सूर्याभोवती भ्रमण करतो हे ही आपल्याला समजू शकतं. अशा चंद्राचा एका राशीतून भ्रमणाचा कालावधी साधारणत: २.२५ (सवा दोन) दिवसांचा आहे.

चंद्र ज्या राशीत असतो ती आपली जन्म राशी मानण्याची भारतीय ज्योतिषशास्त्राची परंपरा आहे. सर्वात जास्त वेगवान चंद्र असल्याने चंद्राला मनाची उपमा दिली आहे. मन जसं कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी पोहोचतं किंवा कोणताही विचार करतं अन मनाला भारती-ओहोटीही येते तसाच चंद्रही दर दोन-अडीच दिवसांनी आपले रूप आणि राशी बदलतो आणि म्हणून माणसाची राशी चंद्रावरून पाहण्याची आपली प्रथा आहे. चंद्र मनाप्रमाणे चंचल आहे. चंद्राला स्त्री व जलतत्वाचं मानलं जातं..
आपले सण चंद्राच्या भ्रमणावर अवलंबून असतात म्हणून सणाचे दिवस मागेपुढे होतात. अधिक महिनाही चंद्रभ्रमणाचं फल आहे. साडेसातीचा आणि चंद्राचा जवळचा संबंध आहे म्हणून हे लक्षात ठेवावं..!

सूर्य भ्रमण –
सूर्य कुठेही भ्रमण करत नसला तरी आपल्याला सूर्य रोज उगवताना व मावळताना दिसतो. म्हणजे पृथ्वीवरून पाहताना सूर्य भ्रमण करतो असे आपल्याला दिसते. सूर्य स्थिर असून प्रत्यक्षात पृथ्वी फिरत असते म्हणून आपण सूर्य बुडाला किंवा उगवला असे म्हणत असतो. ज्य्तोतीषशास्त्रात याला पृथ्वीभ्रमण न म्हणता सूर्य भ्रमण असे म्हणतात व सूर्याचा प्रत्येक राशीतून भ्रमणाचा कालावधी एक महिन्याचा असतो. एक वर्षात सूर्य सर्व १२ राशींचे भ्रमण पूर्ण करतो असे मानले जाते. मकर संक्रांति हे याचे उत्तम उदाहरण. दरवर्षी १४ जानेवारीला मकर संक्रांत न चुकता येते. आपल्या इतर सणाप्रमाणे ही तारीख मागे-पुढे होत नाही कारण मकर संक्रांति म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश आणि तो दर वर्षी न चुकता त्याच दिवशी होतो. दरवर्षीच्या १४ जानेवारीपर्यंत सूर्य सर्व राशी फिरून मकर राशीत प्रवेश करतो. मतर राशीत सूर्याने केलेले संक्रमण म्हणून मकर संक्रांत..
ज्योतिष शास्त्रात सूर्य व चंद्र हे दोन महत्वाचे घटक असल्याने वर शक्य तेवढं विस्ताराने लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. शनि हा साडेसातीशी संबंधीत असल्याने त्याच्याबद्दल पुढील भागात विस्ताराने लिहीन. बाकी इतर ग्रहांचा राशी भ्रमणाचा वार्षीक कालावधी थोडक्यात देत आहे.
बुध ८८ दिवसांत यर्व १२ राशीतून भ्रमण करतो म्हणजे एका राशीत बुध साधारणत: ७-८ दिवस असतो. ग्रहांच्या भ्रमणाची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने हा कालावधी जास्तीत जास्त १७-१८ दिवसाचा होतो. हा कालावधी चंद्राखालोखाल बुध वेगवान असल्याने चंचल वृत्तीचा मानला गेला आहे, तो त्याच्या या एका राशीत कमी दिवस राहाण्याच्या सवयीमुळे.

शुक्र २२५ दिवसांत सुर्य प्रदक्षिणा म्हणजे १२ राशीतून भ्रमण पूर्ण करतो. म्हणजे शुक्र एका राशीत सामान्यत: १८ ते जास्तीत जास्त २४-२५ दिवस असतो.
मंगळ सुर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास साधारणत: ६८७ दिवस घेतो. १२ राशींना ६८७ दिवस म्हणजे एका राशीत कमीत कमी साधारणत: ४५ दिवस ते जास्तीत जास्त ५७-५८ दिवस म्हणजे ढोबळ मानाने दोन महीने मुक्कामाला असतो.

तर गुरू सुर्य एका प्रदक्षिणेला १२ वर्षाचा कालावधी घेतो. याचा अर्थ गुरू एका राशीत एक वर्षभर असतो.
गुरूनंतर येतात शनीनहाराज, जे एका सूर्य प्रदक्षिणेला अदमासे २९-३० वर्ष घेतात. सूर्याभोवतालच्या १२ राशीतून भ्रमण करण्यासाठी ३० वर्ष तर एका राशीत मुक्राम २.५ वर्ष होतो.

गुरूपर्यंतचे हवेहवेसे वाटणारे ग्रह फार तर वर्षभरात मुक्काम हलवतात आणि नको असलेला शनीसारखा पाहूणा मात्र २.५ वर्ष राहातो. नुसती २.५ वर्ष असती तरी आपण ढकलली असती परंतू तो ७.५ वर्ष पिडणार या ‘समजूतीने’च आपण खलास होतो. ही ७.५ वर्षांची भानगड काय आहे हे पुढील भागात समजावतो. ते नीट कळावं यासाठी हा लेखनप्रपंच..!

हर्षल, नेपच्यून प्लुटो हे एका राशीत अनुक्रमे ७, १६ व २४ वर्ष राहातात आणि
राहू व केतु हे अठरा महिने एका राशीत
राहतात पण आपल्याला या ग्रहांचा साडेसाती या विषयात अभ्यास करण्याची आवश्यकता नाही.

साडेसाती म्हणजे काय?

आपला जन्म चंद्र ज्या राशीत असतो त्याला आपली जन्मराशी असे म्हणतात. बारा राशींपकी आपली कोणतीही राशी असू शकते. भारतीय लोकांना जन्मराशी सहसा माहीत असते. या राशीच्या अगोदरच्या राशीत तो आला की साडेसाती सुरू होते. आपल्या जन्मराशीत आला असता साडेसातीचा मध्य असतो आणि त्याच्या पुढच्या राशीत आहे तोपर्यंत हा तिसरा टप्पा असतो आणि अशी ही साडेसाती चालू असते. शनी एका राशीत साधारणपणे अडीच र्वष असतो. म्हणजे आपल्या राशीच्या अगोदरच्या राशीतली अडीच वष्रे ही पहिली अडीचकी. आपल्या राशीतला अडीच वर्षांचा काळ ती मधली अडीचकी आणि आपल्या पुढच्या राशीत असलेला शनीचा अडीच वर्षांचा काळ ही तिसरी अडीचकी. अशा तीन अडीचकी मिळून साडेसात र्वष अशी ही साडेसाती असते. सर्वसाधारण तीन साडेसातींचा काळ मनुष्याला अनुभवावा लागतो. आणि शतायुषी असणाऱ्यांना कदाचित चार साडेसातीही पाहता येते.

शनि म्हटले की सर्वांच्या अंगावर काटा उभा रहातो, नाहक भीती वाटू लागते. त्यातच टी. व्ही. वर शनि बद्दल कोणी ना कोणी काही ना काही तरी बोलतच असतात. त्यातून काही तरी माहिती मिळते - शनि म्हणजे वाईट, खराब, प्रत्येक बाबतीत विलंब...त्यातच शनिची साडेसाती, शनिची दृष्टी, शनिचा प्रभाव...वगैरे वगैरे....म्हणजेच थोडक्यात लोकाना भरपूर घाबरवले जाते...पण खरे सांगायचे झाले तर शनि सारखा प्रामाणिक,न्याय देणारा, आध्यात्मिक,सचोटीने व सातत्याने काम करणारा, संशोधनवृत्ती असणारा दूसरा कोणताही ग्रह ग्रहमालेत नाही. ज्योतिषशास्त्रीयदृष्टया शनि हा वायुतत्वाचा तसेच मकर व कुंभ राशींचा अधिपती आहे.त्याची आवडती रास कुंभ आहे 

शनि संस्कराचा बराचसा भाग पत्रिकेत दाखवत असतो. हा ग्रह पुर्वकर्मांचा व प्रारब्धाचा कारक आहे. बरयाच कालावधिने घडणारया गोष्टी शनि दाखवतो..... पण त्याचबरोबर अनेक कष्ट करण्याची ,दिर्घोद्योगाची चिकाटी शनि जवळ आहे. उत्तम प्रकारचे नियोजन,सुत्रबद्ता,सुसंगता उभी करणारा असा आहे. मोठमोठी, प्रचंड, यशस्वी,दूरगामी परिणाम करणारी कामे शनिच करू शकतो. तरीही शनिला नेहेमी हिणवले जाते त्याचे वाईट वाटते...

साडेसाती : शनिची साडेसाती बापरे....कधी दुसरया ग्रहाची साडेसाती ऐकली आहे का तुम्ही ?? त्याचे कारणही तसेच आहे.....

शुक्र, चंद्र, सूर्य, गुरु, बुध इ.ग्राहांबद्द्ल नेहेमीच चांगले वाचत आलो आहोत आपण.....ते ग्रह पत्रिकेत कशी चांगली फळ देतात ते तर अनेक ज्योतिषांकडून ऐकलेलेही असेल. पण मला असे वाटते की हे सर्व ग्रह हे फसवे आहेत...कारण जीवनाची खरी बाजू दाखवण्याची ताकद ही फक्त शनितच आहे....

साडेसाती म्हणजे साडेसात वर्षांचा कालखंड. आपल्या मागची रास,आपली रास व त्याच्या पुढील रास अशा तीन राशीतून जेंव्हा शानिचे भ्रमण होते असते तेंव्हा त्याला साडेसाती असे म्हणतात. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्ष लागतात...म्हणजे समजा तुमची राशी मकर आहे....त्याच्या आधीची राशी आहे धनु.......म्हणजेच जर शनिने मकर राशीत प्रवेश केला तर धनु, मकर आणि कुंभ  ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली.
पण साडेसातीचाही खुप बाऊ केला जातो, साडेसाती म्हणजे वाईट घडणारया गोष्टींचा काळ, कुठलेही काम व्यवस्थीत होणार नाही, कामे रेंगाळत रहातील वगैरे ......पण खरे तर शास्त्रात असेही म्हटले आहे साडेसाती म्हणजे ह्या सर्व गोष्टी होणारच परंतु जी व्यक्ती सचोटीने काम करते... खोटे बोलत नाही.. आळस करत नाही .....न्यायाने वागते...त्या व्यक्तीना साडेसातीचा त्रास जाणवत नाही. पण खरे म्हटले तर आताच्या युगामध्ये हे सर्व पाळणे अशक्य आहे....सचोटीने काम करणारयालाच प्रमोशन मिळत नाही, खोटे तर दिवसातून कित्येकदा बोलावे लागते...मग ह्यावर उपाय काय ?? ह्यावरून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती ही की तुम्ही साडेसाती साडेसाती म्हणुन ज्या गोष्टीचा बाऊ करताय ती तर पन्नास-शंभर वर्षापूर्वीपासून आहे....मग आजच इतकी बोंबाबोंब का होते ?? ह्याला जबाबदार आपणच आहोत...ह्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे हे सर्व परिणाम आहेत......जेंव्हा एकत्र कुटुंबपद्धती होती तेंव्हा म्हातारया-कोतारयांपसून अगदी शेंबड्या पोरापर्यंत सर्व एकाच घरात...एकाच छताखाली रहात.....प्रामाणिकपणा होताच पण त्याच बरोबर त्याने सर्वांमध्ये एकप्रकारची बांधीलकी होती...प्रत्येकाकडून घरातल्या म्हातारया-कोतारयांची सेवा होत होती.... प्रेम होते, आपलेपणा होता आणि मुख्य म्हणजे पैशांचा हव्यास नव्हता. जे जसे चालू आहे त्यात सर्व सुख आणि समाधान मानून चालणारे होते.... आज हे सर्व नाही जमले तरी आपल्या आई- वडिलांची सेवा जरुर करू शकता...सेवा म्हणजे कमीत कमी त्यांच्याजवळ बसून काही वेळ जरी त्यांच्या बरोबर व्यतीत केला.... सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी नेले...हे जरी करू शकलो तरी त्यांना बरे वाटेल....तुम्हाला आशिर्वाद तर मिळेलच त्याच बरोबर एक समाधानही वाटेल...शनि हा वृद्ध व्यक्तींचा कारक आहे असे म्हटले जाते....जेव्हा तुमच्याकडून आई-वडिलांची किंवा कुठल्याही वृद्ध व्यक्तींची सेवा होते,त्यांना अपशब्द बोलले जात नाहीत....तेंव्हा असे म्हटले जाते शनिची कृपादृष्टी तुमच्यावर पडायला वेळ लागत नाही. उलटपक्षी साडेसातीत बरयाच लोकांचे भले झाले आहे.... शैक्षणिकदृष्टया व आर्थिकदृष्ट्या लोकांची प्रगती झालीआहे ... ....मोठमोठ्या उद्योजकांचे नवनवीन कारखाने उभे राहीले आहेत.............

ह्याचबरोबरीने अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे शनि हा जीवनाची खरी बाजू, खरे स्वरुप तुम्हाला जाणवून देतो...जेंव्हा साडेसातीची सुरवात होते तेंव्हा त्या लोकांना त्याची जाणीव होते ती एकामागोमाग होत असलेल्या संकटाच्या मालिकेतून ........ह्याच वेळी खरया अर्थाने आपली माणसे कोणती .....ऐनवेळी मदतीचा हात अपेक्षीत असताना आपल्याला सोडून जाणारी माणसे कोणती ते ह्याच वेळी लक्षात येते....
म्हणुन मला वाटते की एकदातरी माणसाच्या आयुष्यात साडेसाती यावी आणि त्याला त्याच्या खरया माणसांची ओळख पटावी...

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. *शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

आपले कोण व परके कोण?

साडेसातीमध्ये आणखी एक गोष्ट आपल्याला कळून चुकते. खरीच आपली माणसे कोण आणि परकी कोण हे या काळात कळते. एरवी आपण ज्यांना मदत केली, ज्यांच्यासाठी आपला वेळ दिला, झुरत राहिलो, त्याच्या कल्याणासाठी झटत राहिलो ती माणसे या साडेसातीच्या काळात येतीलच असे नाही. आपल्या मताचा आदर ते राखतीलच असे नाही. त्यामुळे हेच का ते, असा प्रश्न पडतो आणि त्यामुळे मनस्ताप होतो. हा मनस्ताप एवढाच भाग खरे तर साडेसातीत असतो. पण कदाचित ज्याला आपण झिडकारले किंवा कमी महत्त्व दिले अशी एखादी व्यक्ती आपल्याला येऊन मदत करते. म्हणजे आपले नातेवाईक असो, परिचित असो वा मित्रपरिवार, खरेच आपले कोण आहेत हे दाखवून देणारी साडेसाती असते. स्वत:ची  व सर्व सगेसोयऱ्यांची खरी ओळख शनी करून देतो. त्यामुळे साडेसातीमध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकतो.

खरा त्रास याचाच…

खरे तर साडेसातीमध्ये फार काही अजब अघटित घडते किंवा संकटांची मालिका येते ही काल्पनिक भीतीच आपल्याला अस्वस्थ करत असते. साडेसाती असणाऱ्यांच्या मनात भयगंड निर्माण होतो. न्यूनगंडही निर्माण होतो. साडेसातीमध्ये आता आपले काही खरे नाही, अशा मानसिक भीतीमुळे येणारे मानसिक दौर्बल्य आपल्याला त्रास देत असते. मनस्ताप होतो. प्रत्यक्ष झाला नाही, कसल्याही दुर्घटना घडल्या नाहीत तरी या काल्पनिक भीतीचे सावट मनावर असते. मुख्यत: ते दूर ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे असते.

साडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून पाहिल्या जाणाऱ्या जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. अर्थात नखाला दुखापत झाली तरी पूर्ण शरीराला वेदना होतात तसं इथे होतं.
शनी ज्योतिषशास्त्रात पाप ग्रह मानला गेला आहे परंतु मुळात तो तसा नाही. शनी न्यायी आहे आणि न्याय करताना तो अजिबात आपपरभाव करत नाही. शनी मृत्यूचा कारक आहे. साडेसातीत काही लोकांवर कठीण प्रसंग येतात हे खरे असलं तरी याच काळात आपलं कोण आणि परकं कोण याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा नको हे जीवन असेही प्रसंग काही लोकांवर येतात परंतु स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून सुलाखून बाहेर पडतात. म्हणजे शनी चिकाटी आणि सहनशीलता वाढवतो ज्याचा अंतिमतः आपल्याला फायदाच होतो..शनी वाईट काहीच करत नाही तर आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळ देतो. शनीच्या स्वतःच्या राशी असलेल्या मकर आणि कुंभ या राशींना साडेसाती तेवढीशी वाईट जात नाही कारण शनीच्या असलेल्या ह्या राशी मुळात चिकाटी असलेल्या, मेहेनती असतात त्यामुळे ह्या राशीच्या लोकांना साडेसातीचा प्रभाव जाणवत नाही.

अर्थात शनीची चांगली-वाईट फळं मिळणं हे प्रत्येकाच्या कुंडलीतील मूळ ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. तसंच व्यक्तीच्या वयावरदेखील अवलंबून असतं. लहान मुलं किंवा फार वृद्ध व्यक्तींना साडेसाती अनुभवायला येत नाही कारण लहान वयात आपण आपल्या पालकांच्या पंखाखाली असतो तर वृद्धत्वात सर्व काही भोगून झाल्यामुळे साडेसाती आली काय आणि गेली काय, सारखंच अशी परिस्थिती असते.

राशीनुसार साडेसातीचे टप्पे
26 जानेवारी नंतर शनि महाराज बारा राशीनुसार कसे फल आणि भ्रमण असणार ते पाहू

राशीफल
पहिला टप्पा - दुसरा - तिसरा -भ्रमण

मेष :- सम - अशुभ - शुभ -नववा(शुभ)

वृषभ :-अशुभ-शुभ-शुभ- अठवा(अशुभ)          

मिथून:- शुभ-शुभ- अशुभ-सतवा (शुभ)

कर्क:-शुभ-अशुभ-अशुभ-सहवा(मध्यम)

सिंह:-अशुभ-अशुभ-शुभ-पचवा (शुभ)

कन्या:-अशुभ- शुभ-शुभ-चौथा(अशुभ)

तूळ:-शुभ-शुभ-अशुभ- तिसरा(शुभ)

वृश्चिक:-शुभ-अशुभ-सम-दुसरा(शुभ)

धनु :- अशुभ-सम-शुभ- पाहिला(मध्यम)

मकर:-सम-शुभ-शुभ-बारावा(अशुभ)

कुंभ:-शुभ-शुभ-सम-अकरावा(शुभ)

मीन:-शुभ-सम-अशुभ-दहवा(मध्यम)

राशीनुसार तर शनि महाराज फल देताच
आणि जन्म कुंडली नुसार कोणत्या स्थानातुन शनि महाराज देणार हे पाहू
आपल्या जन्मकुंडली समोर ठेऊन फल
पाहा...

मेष लग्न असेल तर शनि तुमच्या भाग्यातुन जात आहे. दशमेश व्ययात जाण्याने नोकरीत उपद्रव घडेल पण पैशाची चिंता असणार नाही. जास्त मानसीक त्रास होईल.

वृषभ लग्न असेल तर शनि अष्टमातुन जात आहे. संकटे येणार आहेत. तयार राहा. पण आत्मविश्वास गमाऊ नका. यातुनही बाहेर पडणार आहात.

मिथुन लग्न असेल तर शनि सप्तमातुन जाणार आहे.  जोडीदाराशी जुळवुन घ्या. जोडीदाराच्या घरच्या मंडळींचा जास्त त्रास होईल. इलाज नाही.

कर्क लग्न असेल तर शनि षष्ठ स्थानातुन जाणार आहे. एखादी कोर्ट केस असेल तर बुध्दी चातुर्यावर ती जिंकाल. शनि सहाव्या स्थानी असताना शत्रु नांगी टाकतील.परिस्थीतीवर नियंत्रण ठेवा. कारण अष्टमेश सहाव्या स्थानातुन जाणार आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.

सिंह लग्न असताना शनि पंचम स्थानातुन जाणार आहे.  विद्यार्थी असाल तर अभ्यास जास्त करा. मुले शिकत असतील तर त्यांच्या शैक्षणीक प्रगतीवर लक्ष ठेवा.

कन्या  लग्न असेल तर शनि चतुर्थामधुन जाणार आहे. सुखाला ग्रहण लागेल. वहान त्रास देईल. घरात सुख रहाणार नाही. मातेशी पटणार नाही.

तुळा लग्न असेल तर शनि तृतीय स्थानातुन जाणार आहे. भावंडांशी वाद होतील किंवा त्यांची काळजी करावी लागेल. लेखनाने अडचणीत येणार नाहीना हे पहा.

वृश्चिक लग्न असेल तर शनि कुटुंब स्थानातुन जाणार आहे. कौटुंबीक विवाद तुम्हाला जास्त त्रास देतील. मातेला मनवण्यासाठी खुपच प्रयत्न करावे लागतील.

धनु लग्न असताना शनि तुमच्या लग्न स्थानातुन जाणार आहे. तुमच्या पर्सनालिटीत काही आश्चर्य कारक बदल होतील. तुम्ही बदलेले आहात असे सर्व म्हणतील. डायरी लिहा आणि हे बदल नोंद करा. धनु राशीला हे बदल आश्चर्यकारक असतील.

मकर लग्न असताना शनि तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानातुन जाणार आहे. व्यवसायीक असाल तर नुकसान संभवते. खर्च जोडीदारासाठी सुध्दा करावा लागेल.

कुंभ लग्न असताना शनि तुमच्या लाभातुन जाणार आहे. मनाप्रमाणे अनेक गोष्टी पुढील अडिच वर्षात असुन घडणार आहेत.

मीन  लग्न असताना शनि तुमच्या दशमातुन जाणार आहे. प्रसिध्दीला ग्रहण लागेल. नोकरीत अधिकार सोडावा लागतो की काय अशी परिस्थीती येईल.

गोचर भ्रमण नुसार शनिमहाराज हे
कन्या राशिला चौथा (अशुभ)
कर्क राशिला सहवा (अशुभ)
वृषभ राशिला अठवा (अशुभ)
मकर राशिला बारावा साडेसाती सुरूवात झाली आहे खालील उपाय करावेत

साडेसातीचा त्रास कमी व्हावा म्हणून शनि मंत्र म्हणावा असे म्हणतात . ह्या स्तोत्रांचा उपयोग संयम, परिपक्वता एखाद्या गोष्टीकडे तटस्थ दृष्टीने बघण्याची कुवत , मानसिक शांती ह्या दृष्टीने होत असावा त्यामुळे आपोआपच समस्या कमी वाटू लागतात किंवा समस्यांशी लढण्याचे बळ येत असावे .
साडेसाती म्हणजे शनि महाराजांची आपल्यावर वक्रदृष्टी झाली आहे. त्यामुळे आता आपलं कायं होणार? यावरच काही उपाय देखील आहेत.
शनिची प्रतिकूल अवस्था आपल्या दिनचर्येलासुद्धा प्रभावित करते. त्यामुळे आपल्या पत्रिकेत शनि दोष आहे किंवा नाही हे पाहणे आवश्यक आहे.

पुण्यकालात शनि महाराजाचा दोष दूर करण्यासाठी उपाय करा:
-तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.
-श्री गनपती श्री हनुमान  श्री शनि  याना श्री रूद्र अभिषेक व
आराधना करावी.
-मांस- मद्य यांचे सेवन करू नये.
-दीन दुबळ्यांना मदत करावी.
-काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

शनि मंत्र

ॐनीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम् I
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम् II

ध्यानम:-नीलाम्बर: शूलधर: किरीटी गृद्ध्स्थितस्त्रासकरो धनुश्मान.चतुर्भुज: सूर्यसुत: प्रशान्त: सदाअस्तु मह्यं वरदोअल्पगामी..

शनि गायत्री:-ॐ  कृष्णांगाय विद्य्महे रविपुत्राय धीमहि तन्न: सौरि: प्रचोदयात.

वेद मंत्र:-ॐ प्राँ प्रीँ प्रौँ स: भूर्भुव: स्व: ॐ शन्नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये शंय्योरभिस्त्रवन्तु न:. ॐ स्व: भुव: भू: प्रौं प्रीं प्रां ॐ शनिश्चराय नम:

जप मंत्र :- ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनिश्चराय नम:।
नित्य २३००० जप प्रतिदिन.

1)शनि ग्रहसाठी उपाय श्री पिपंळ वृक्षाला रोज 21 प्रदक्षिणा करा व शनिवार फक्त फल आहार करवा

2)रोज श्रीगुरु चरित्राचा एक अध्याय वाचा

3)आपल्या श्रीगुरुच्या प्रतिमेची पुजन व
भक्ती करा

4) रोज श्री हनुमान चालीसा पाठ करा

5)रोज संध्याकाळी पिपंळ वृक्ष किवा
शमी वृक्षा खाली दिवा लावावा अथवा या दोन्ही वृक्षाचे पुष्य नक्षत्रावर किंवा श्रवण नक्षत्रावर हे वृक्ष लावावी

6)या काळात विद्यार्थीजांना अभ्यास आळस असणार त्यामुळे त्यांनी
श्री गनपती ची दर्शन करावे व दर बुधवारी श्रीगनपतीच्या मंदीरात अकरा
मोदक अर्पण करा हा उपाय केल्यावर
सर्वानाच फायदा होईल

7)साडेसातीच्या काळात आपण श्रीक्षेत्र राक्षसभुवन (ता.गेवराई,बीड)
हे श्रीक्षेत्र भगवान श्रीरामचंद्र वनवासत
असताना इथेच श्रीशनि देवाची स्थापना
करून पुजा केली होती आणि दुसरे
शनिशिंगणापुर येथे अधुनमधुन जाऊन शनिमहाराजांचे प्रार्थनापुर्वक दर्शन घेऊन यावे. अनवधानाने झालेल्या अपराधांची क्षमा मागावी.

8)साडेसातीच्या काळात शनी महात्म दर शनीवारी, शनी वज्रपंजरकवचं आणि शनी-स्त्रोत्र (दशरथ श्रृषीनी लिहिलेले)
दररोज वाचावे.

9) दर शनीवारी तेल लावून अभ्यंग स्नान
करावे

10) रोज न चुकता आपल्या देवता स्वरूप आईवडिलांचा पाया डोके ठेवून दर्शन करा या उपायाने आपणास शनि ग्रहची पिडा होणार नाही ही विनंती...

11) रत्न:
शनिदेव या ग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रों नुसार शुद्ध निलम रत्न वापरण्याचे मी पण प्रमाण देते कारण मंत्र व रत्न हे देवाने मनुष्याचे ग्रहांपासून रक्षण करण्यासाठी निर्माण केले आहे व त्यामुळे रत्नांचा वापर करावा (रत्न का वापरतात या विषयावरचा लेख लवकर माहिती देतो)

दि 26-01-2017 पासुन वृश्चिक - धनु मकर या राशींना साडेसाती आहे. (तुला राशीची साडेसाती संपते) 20 जुन 2017रोजी शनि महाराज वक्री वृश्चिक राशीत प्रवेश करेल आणि 26 ऑक्टोबर 2017 
रोजी पुनः शनि महाराज धनु राशीत प्रवेश करतील...

साडेसाती:-

मेष:- दिनांक २९ मार्च २०२५ रोजी सुरु होईल व दिनांक ३१ मे २०३२ रोजी संपेल.

वृषभ:- ३ जुन २०२७  रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३४ रोजी संपेल.

मिथुन:- ८ अॉगष्ट २०२९  रोजी सुरु होईल व दिनांक २७ अॉगष्ट २०३६ रोजी संपेल.

कर्क:- ३१ मे २०३२ रोजी सुरु होईल व दिनांक १३ जुलै २०३९ रोजी संपेल.

सिंह:- १३ जुलै २०३४ रोजी सुरु होईल व दिनांक २६ सप्टेबर २०४१ रोजी संपेल.

कन्या:- २७ अॉगष्ट २०३६ रोजी सुरु होईल व दिनांक ३० अॉगष्ट २०४४ रोजी संपेल.

*तुला:- १० सप्टेंबर २००९ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपेल.*

वृश्चीक:- ५ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २४ जानेवारी २०२० रोजी संपेल.

धनु:- २ नोव्हेंबर २०१४ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

मकर:- २६ जानेवारी २०१७ रोजी सुरु झालेली असुन सध्या साडेसाती चालु आहे. दिनांक २९ मार्च २०२५ रोजी संपेल.

कुंभ:- २४ जानेवारी २०२० रोजी सुरु होईल व दिनांक २३ फेब्रुवारी २०२८ रोजी संपेल.

मिन:- २९ एप्रिल २०२२ रोजी सुरु होईल व दिनांक १७ एप्रिल २०३० रोजी संपेल.

      कृपया कॉपी पेस्ट करून ठेवावे. केंव्हाही कामास येऊ शकेल.

     धन्यवाद!!!
🏻

विषेश नोट:- साडेसाती मध्ये श्रीशनि महाराज हे स्त्रीयाना मुळीच त्रास देत नाही कारण ब्रह्मवैवर्त पुराण नुसार शनिमहाराजची आई छायादेवीनी असे सांगितले आहे की कोणत्याही स्त्रियांना
तुझ्या साडेसाती त्रास होणार नाही म्हणुन स्त्रीयाना कधीच साडेसाती नसते ही नोंद घ्यावी

श्रीगुरु देव दत्त
नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज
जय शनिदेवा.....

ज्योतिष राहुल नारायणराव पुराणिक
९४२२२१६१७९
ज्योतिष आकाश नारायणराव पुराणिक
९८२३३१६१७९
जालना